मुळातच लोकसभा निवडणुका वेगळ्या कारणासाठी लढवल्या जातात. त्यामध्ये राष्ट्रीय दृष्टिकोन हा केंद्रस्थानी असतो. म्हणजेच केंद्रातील सरकार देशाचे संरक्षण व देशाचा आर्थिक विकास कसा करणार या व इतर परिणामांद्वारे जनता आपले मत नोंदवते. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान मात्र निराळे मुद्दे महत्वाचे ठरू शकतात. अर्थातच प्रस्थापितांच्या विरोधी जनमताचा रेटा (anti-incumbency factor) हा मुद्दा प्रकर्षाने मोठा असतो. आपल्या संघराज्य पद्धतीप्रमाणे लोकसभा निवडणुकां इतकेच विधानसभा निवडणुकांनाही महत्व आहे. लोकसभा निवडणुकीने केंद्रसरकार बनते तर विधानसभा निवडणुकीने राज्यसरकार, अर्थातच परराष्ट्र, संरक्षण, अर्थ, दळणवळण अशी कानी महत्वाची खाती आणि विभाग सोडले तर राज्य सरकारकडे संपूर्णच खाती परंतु…
द्विपक्षीय / द्विधृविय पद्धतीचा उगम
अमेरिका आणि ब्रिटन या दोन लोकशाही राज्यपद्धती असणाऱ्या देशांमध्ये साधारणतः दोन मुख्य पक्षांमध्येच निवडणुका लढल्या जातात. सुदृढ आणि परिपक्व लोकशाहीचे ते एक लक्षण आहे. इंग्लंडमध्ये हुजूर पक्ष व मजूर पक्ष तसेच अमेरिकेमध्ये रिपब्लीकन पक्ष व डेमोक्रॅटिक पक्ष असे दोन महत्वाचे पक्ष आहेत. इतर अनेक युरोपियन देशांमध्ये साधारणतः अशाच प्रकारची पद्धत आहे. आपल्या लोकशाही राज्यपद्धतीमध्ये आपण इंग्लंड प्रमाणे सांसदीय लोकशाही राबवतो अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत नव्हे (तेथे राष्ट्राध्यक्षांची निवड प्रत्यक्ष जनतेमार्फत होते.) साहजिकच व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्ती प्रमाणे आपल्याकडे ढीगभर पक्ष अस्तित्वात होते व आहेत. सांसदीय लोकशाहीमध्ये मुख्यतः “सत्तारूढ पक्ष वा…
१६ व्या लोकसभेची निवडणूक ‘बोलणारे आकडे’
१६ मे रोजी निवडणुकांचा निकाल बाहेर आला. त्याच बरोबर निकालाबद्दल आनंद, आश्चर्य, उत्साह, दुःख, राग, रोष याचबरोबर त्याचे मंथन म्हणजे एक प्रकारे चर्वितचर्वण सुरु झाले. अर्थात हा निकाल सर्वार्थाने ऐतिहासिक असाच आहे. त्यामुळे होणारे बदल हे पुढील कित्येक वर्षे भारताचे राजकीय भूगोल व आर्थिक घडी बदलण्यास कारणीभूत ठरतील. भारत हि एक उगवती राजकीय व आर्थिक महासत्ता असल्याने साहजिकच त्याचे वैश्विक परिणाम सुद्धा होतील. साधारणतः आपल्याकडे निवडणुकांमधून मिळणाऱ्या साध्या बहुमाताद्वारे येणारे सरकार ठरत असते. त्यामुळे मतदान आणि मतदार यांचे गुणोत्तर फार महत्वाचे ठरते. अतिशय गमतीचा भाग हा आहे कि आज पर्यंत…
भारतीय रेल्वेची जडण-घडण
‘झुक् ऽ झुक् ऽऽ झुक् झुक् आगीन गाडी, धुरांच्या च्या रेषा हवेत काढी’ हे बालगीत आपल्या सगळ्यांच्या मनामनात अगदी पूर्णपणे ठसलेले आहे. समस्त मराठी जनांच्या भाव विश्वाची सुरुवात करणाऱ्या अनेक कविता व बालगीतां मध्ये कदाचित हे गीत अग्रस्थानी असेल. तत्समच त्यातील ‘आगीनगाडी’ सुद्धा सर्वांच्या आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. एकप्रकारे भारताची भौतिक प्रगती ही रेल्वे च्या बरोबरीने झालेली आहे; अर्थात हा एका वेगळ्या व मोठ्या लेखाचा विषय असू शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांच्या ज्या काही चांगल्या पाउलखुणा आपल्याला दिसतात, त्या मध्ये ‘रेल्वे’ ही ‘धरोहर’ कदाचित प्रथमस्थानी असेल. माझ्या लहानपणी यवतमाळ…
इराक युद्ध, सद्दाम हुसैन आणि अमेरिका
३० डिसेंबर २००६ रोजी इराकच्या प्रमाण वेळे नुसार पहाटे माजी अध्यक्ष सद्दाम हुसैन यांना फासावर चढवण्यात आले आणि एक हुकुमशहा काळाच्या पडद्याआड गेला. मानवीय दृष्टिकोनातून या घटनेचे विश्लेषण केल्यानंतर क्लेशदायक बाबी नजरे समोर येतात. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून हीच घटना एक दीर्घ आणि अतिशय गहन विषयवस्तू समोर आणते. पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेश यातील एक महत्वाचा देश इराक खनिज तेलाने पर्यायाने पेट्रोडॉलरने समृद्ध व संपन्न देश. येथे १९७९ साली तत्कालीन अध्यक्ष अल-ब्रक यांना राजीनामा द्यावयास भाग पाडून सद्दाम हुसेन हे क्रमांक २ चे नेते व तत्कालीन उपाध्यक्ष सत्तारूढ झाले.…
