बदलता प्रवास ‘हम लोग’ आणि ‘ बूनियाद’ या दूरदर्शनवरील सोप ओपेरांचा म्हणजे सिरीयलचा सुरू झालेला प्रवास आज फार वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. हल्लीच्या डिजिटल मीडियाच्या जमान्यात वेब सिरीज, ‘स्ट्रीमिंग लाईव्ह’ द्वारे प्रसारित होणारे कार्यक्रम ‘टॉक शो’, रियालिटी शो या बरोबरीने विविध भाषिक मालिकांचे स्थान कायम आहे. याचमुळे विविध चॅनेल्स आणि त्यावर चालणारे विविधरंगी कार्यक्रम यांची सदोदित भरमार होत असते. या सर्वांमध्ये दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनी आणि त्याचे मराठी अपत्य सह्याद्री वाहिनी आपले अढळ स्थान जनमानसात आजही रुजवून आहेत. याच सह्याद्री वाहिनीवर नवीन मालिका सुरू आहे ‘आमची अनन्या’… अनन्या: मुख्य पात्र…
Day: December 3, 2024
2024 महाराष्ट्राच्या निवडणुकीचा अन्वयार्थ
ऐतिहासिक पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून, आजपर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये, या निवडणुकीचे महत्व आलेल्या निकालामुळे, वेगळेपणाने अधोरेखित होते. त्यासाठी काही गोष्टी विशेषत्वाने नमूद कराव्या लागतील. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा आणि बरोबरीने समाजकारणाचा विचार करताना काही गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. एकतर असे आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून साधारणपणे सुरुवातीची पाच दशके महाराष्ट्रावर काँग्रेसचे एकछत्री राज्य होते. अपवाद होता फक्त १९७८ पासून च्या दीड -पावणेदोन वर्षांचा. तेंव्हा काँग्रेसमधून फुटुन पुलोद ची स्थापना करणारे शरद पवार राज्याचे मुखामंत्री झाले. त्यानंतर फक्त १९९५ पासून, पुढील साडेचार वर्षे, प्रथमतः काँग्रेसेतर सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. भाजपचा उदय…
