चीनचा चढता आलेख व भारतावर होणारे त्याचे संभाव्य परिणाम

सन १९४९ च्या ऑक्टोबर मध्ये चँग कै शेक यांची राजवट उलथवून चीनमध्ये माओ त्से तुंग यांनी साम्यवादी सरकार स्थापन करून सांस्कृतिक क्रांती घडवून आणली… यानंतरच्या मागील सहा देशाकामध्ये चीनची प्रगती व त्याचा चढता आलेख हा अभ्यासाचा गहन विषय आहे. यामध्ये चीनचा राजनैतिक व लष्करी दबदबा व आर्थिक समृद्धी हे भिन्न अभ्यासाचे विषय असले तरीही ते राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नाण्याच्या ते दोन बाजू दर्शवितात. प्रथम त्यांच्या राजनैतिक स्थित्यंतराचे विश्लेषण करू. माओ व त्यांचे पंतप्रधान चौ एन लाय यांनी एकीकडे भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांचे बरोबर पंचशील करार केला, तर दुसरी कडे तिबेटवर…